या पोस्ट मध्ये तुम्हाला मनाला स्पर्श करणारे Marathi Suvichar, मराठी सुविचार वाचायला मिळतील. विचारामध्ये एवढी क्षमता असते की ते माणसाला पूर्णतः बदलवता येते. चांगले विचार माणसाला घडवतात तर वाईट विचार माणसाला बिघडवतात. माणसाला आयुष्यात योग्य दिशा दाखवण्याचे काम विचार करतात, विचारामुळे माणूस स्वतःला आणि इतरांनाही घडवून शकतो. एखाद्या खचलेल्या माणसाला पुन्हा उभारी देण्यासाठी विचार प्रेरणा देतात. आज आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत.
Table of Contents
Marathi Suvichar | मराठी सुविचार
1. भावनेने मनाला जिंकता येते, प्रेमाने रागाला जिंकता येते, आत्मविश्वासाने अपमानाला जिंकता येते, धीराने अपयशाला जिंकता येते तर माणुसकीने माणसाला जिंकता येते.
2. जी माणसं आपला विचार बदलू शकत नाही ते आयुष्यात काहीही करू शकत नाही.
3. वाया घालवलेला वेळ आपलं भविष्य बिघडवत असतं.
4. चलबिचल करणाऱ्या शेळीपेक्षा शांत राहणारा वाघ केव्हाही चांगला असतो.
5. आपल्या वयापेक्षा आपले विचार कोणत्या वयातील आहेत हे महत्वाचे असते.
6. जीवनात कितीही वाईट प्रसंग येउद्या, चांगलं वागणं कधीच सोडू नका, विजय हा नेहमी सत्याचाच होतो.
7. एकत्र आलं की सुरुवात होते, सोबत राहिलं की प्रगती होते आणि एकत्र काम केलं की लवकर यश मिळते.
8. वागण्यात खोटेपणा नसला की जगण्यात मोठेपणा लवकर मिळवता येतो.
9. दगडाला शेंदूर लावून त्याचा देव करता येईल मात्र माणसाला कोणता रंग लावावा म्हणजे त्याचामाणूस करता येईल.
10. ज्या व्यक्तीजवळ समाधान, सहनशीलता आणि सय्यम असतो तो व्यक्ती आयुष्यात काहीही करू शकतो.
11. प्रत्येक प्रश्नाचे सर्वात चांगले उत्तर म्हणजे शांत राहणे.
12. कधीच कुणाला बेकाम समजू नये कारण बंद घड्याळसुद्धा दिवसातून दोन वेळा बरोबर वेळ दाखवते.
13. केवळ चुकल्यानेच नाती तुटतात असं नाही तर बरीच नाती ही अहंकारानेसुद्धा तुटतात.
14. वय आणि पैसा यावर कधीच गर्व करू नका कारण ज्या गोष्टी मोजता येतात त्या संपतातच.
15. खरं जग हे वाईट लोकांमुळेच कळते.
16. सर्वात जास्त नाती ही फक्त गैरसमजामुळे तुटतात म्हणून बोलत चला.
17. स्वतः कमावलेल्या पैश्यानी एखादी वस्तू खरेदी करून बघा, तुमचे शौक आपोआप कमी होतील.
18. स्वतः कमावलेल्या पैश्यांनी फक्त गरजा पूर्ण होतात शौक नाही.
19. कुठल्याच गोष्टीचा गर्व करू नका कारण आज जे तुमच्याजवळ आहे उद्या ते नसूही शकते.
20. कुणालाच कमी समजू नका, ज्याला तुम्ही दगड समजत असाल तो हिरासुद्धा असू शकतो.
21. जी लोकं सरळ मनात उतरतात त्यांना सांभाळून ठेवा आणि जी मनातून उतरतात त्यांच्यापासून सावध रहा.
22. लोकं आपल्याला कॉपी करायला लागले की समजावं तुम्ही यशस्वी झालात.
23. नातं तेव्हाच तोडा जेव्हा समोरच्यासुद्धा ते नको असेल.
24. प्रत्येक गोष्ट आपल्याला हवी तशी मिळत नसते म्हणून सुख न शोधता समाधान शोधा, आयुष्य खुप आनंदात जाईल.
25. इतरांठी वेळ नसेल एवढं व्यस्त राहू नका आणि कुणीही गृहीत धरेल एवढे स्वस्त सुद्धा होऊ नका.
26. अश्या लोकांना शोधा, जे तुमच्यासोबत वेळ घालावण्यासाठी नेहमी उत्सुक असतात.
27. “मी आहे ना, नको काळजी करू” असं म्हणणारी एक तरी व्यक्ती आयुष्यात असावी.
28. विश्वास आणि आशीर्वाद डोळ्यांनी दिसत नाही मात्र अशक्य गोष्टीलाही शक्य करतात.
29. आयुष्यात वेळेला महत्त्व द्या, आणि तुम्हाला महत्व नाही तिथं चुकूनही वेळ देऊ नका.
30. कडू असणं ही कडुलिंबाची चूक नाही, चूक तर आपल्या जीभीची आहे जीला फक्त गोडच आवडते.
31. स्तुती ऐकायची असेल तर संकटाला हरवाव लागेलच.
32. काहीतरी चांगलं करण्यासाठी वाईट परीस्थितीमधून जावंच लागते.
33. अनेकवेळा आलेले अपयश हे एका यशाने संपून जाते.
34. नशिबात नसलेली गोष्टसुद्धा मिळवता येते फक्त मनगटात ती मिळवण्यासाठी जिद्द असावी लागते.
35. मोठमोठ्या गोष्टी करणारे लोकं मोठे नसतात, तर छोट्या-छोट्या गोष्टी समजून घेणारे मोठे असतात.
36. प्रत्येक दिवशी काहीतरी नवीन शिकत रहा. काय माहिती जीवनात कशाची गरज पडेल.
37. जे तारुण्यातील दिवस झोपेत घालवतात त्यांचे म्हातारपनातील दिवस खूप वाईट असतात.
38. जीवनातील वाईट काळच दाखवून देते की कोण हसतं, कोण दुर्लक्ष करत तर कोण सावरण्यासाठी येतं.
39. माणसाचे जगण्याचे उद्दिष्ट चांगले असले की त्याची वृत्ती आपोआप चांगली होते.
40. काय चुकलं हे शोधाणारे आयुष्यात पुढे जातात, कुणाचं चुकलं हे शोधणारे तिथेच राहतात.
41. जास्त विचार करत बसलं की कृती करण्याची संभावना खूप कमी होऊन जाते.
42. पुस्तकामधील धड्यापेक्षा आयुष्याने दिलेलं धडे जास्त लवकर समजतात.
43. जेवढ्या उंच शिखरावर पोहचाल तेवढे सोबती कमी होतील.
44. लहान तळ्यासारखे गोड रहा, जिथं सिंहसुद्धा खाली मान घालून पाणी पितात.
45. निंदा आणि टीका वाट्याला यायला हवी, फक्त स्तुतीच ऐकू आली तर प्रगतीचे मार्ग बंद होत जातात.
46. जीवनात प्रत्येक व्यक्ती महत्वाचा असतो कारण चांगले लोकं साथ देतात तर वाईट लोकं अनुभव देतात.
47. सर्वात जास्त नाती ही फक्त गैरसमजामुळे तुटतात.
48. फक्त संघर्षाच्या काळातच एकटं राहावं लागतं बाकी चांगल्या काळात सर्वच सोबत असतात.
49. दुसऱ्यांना अडचणीत आणून तुम्ही कधीच यशस्वी होऊ शकत नाही.
50. काही लोकं आनंद मिळेल ते काम करतात तर काही लोकं मिळेल त्या कामात आनंद शोधतात.
Marathi Suvichar Short | मराठी सुविचार छोटे
1. अपयश मिळाल्यानंतर कोणाला काय वाटतं? हे महत्त्वाचं नाही. उठा पुन्हा तयारी करा आणि कधीही हार मानू नका.
2. जीवनात एक गोष्ट खूप महत्त्वाची आहे जोपर्यंत आपण चालणं थांबवत नाही तोपर्यंत आपण किती हळू वेगाने चालत आहोत यामुळे काही फरक पडत नाही.
3. तुमच्या स्वप्न खूप मोठे ठेवा ते पूर्ण करण्यासाठी मेहनत भरपूर करा मात्र ते पूर्ण न करण्यासाठी कोणतीही कारणे देऊ नका.
4. कुठली ही अशक्य गोष्ट ती मिळेपर्यंतच कठीण असते.
5. आनंद हा आपण कोण आहोत? आणि आपल्याकडे काय आहे? यावर अवलंबून नसून आपल्या विचारानुसार तो आपल्याला हळूहळू कळत असतो.
6. आयुष्यात कितीही दुःख असू द्या, ते किती कठीण असू द्या, कधी हार मानू नका या जगात कोणतीही गोष्ट कायमची राहत नाही, दुःखही हळूहळू कमी होईल.
7. तुमच्या मनातील भीतीवर कधीच विश्वास ठेवू नका, कारण तिला तुमच्यातील क्षमता माहिती नाही.
8. आपल्याला त्याच गोष्टी मिळतात ज्यावर आपण लक्ष केंद्रित करतो म्हणून तुम्हाला ज्या गोष्टी हव्या आहेत त्यावरच लक्ष केंद्रित करा.
9. जर पळून पळून थकला असेल तर चालत राहा पण थांबा तेव्हाच जेव्हा तुमी तुमचे लक्ष्य गाठाल.
10. एखादी गोष्ट मिळवण्यासाठी एखादा दिवस किंवा वर्षही लागेल. मात्र जे मिळवायचे आहे त्याचा मार्गा नक्कीच मिळेल.
11. जीवनाची खरी सुरुवात तेव्हाच होते जेव्हा आपण आपला कम्फर्ट झोन सॊडतो.
12. दररोज सकाळी उठल्यानंतर स्वतःला ही आठवण करून दद्या की मला जे मिळवायचे आहे, ते मी मिळवू शकतो.
13. भूतकाळातील अनुभव आणि भविष्यातील प्रेरणा घेऊन आपण वर्तमानात हवं ते मिळू शकतो.
14. तुमचं प्रत्येक यश हे तुम्ही घेतलेल्या एका छोट्याशा निर्णयाने सुरू होते.
15. तुमची सर्व स्वप्न सत्यात उतरतील फक्त तुमच्यात ती पूर्ण करण्याची हिंमत आहे.
16. तुम्हाला जे हवं आहे ते फक्त तुम्हाला एकच व्यक्ती मिळवून देऊ शकतो. फक्त तुम्ही.
17. संधी मिळत नसतात तर त्या तुम्हाला निर्माण कराव्या लागतात.
18. जीवनातील सर्वात मोठा आनंद म्हणजे ते मिळवणे, जे तुम्ही मिळू शकत नाही, असं लोकं म्हणतात.
19. स्वतःला हा प्रश्न नका विचारू की माझ्या जवळ काय नाही आहे. तर हा विचारांची माझ्याजवळ काय आहे.
20. जग तेच लोक बदलतात जे तसा विचार करतात आणि त्यावर कृती सुद्धा करतात.
21. मी अजून मला हवं ते मिळवलं नाही पण कालच्यापेक्षा ‘आज’ थोडा ध्येयाच्या जवळ नक्की गेलो आहे.
22. जर तुम्ही तुमचे स्वप्न पूर्ण नाही केले तर समोरचा तुम्हाला त्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी कामाला ठेवेल.
23. आपल्याला फक्त एकच गोष्ट होऊ शकते. फक्त आपण.
24. आयुष्यात अपयशी झालेल्या बहुतांशी लोकांनी त्या वेळी माघार घेतलेली असते ज्यावेळी ते यशाच्या अगदी जवळ असतात.
25. माणसाला आयुष्यात कुठली एक गोष्ट करावी लागते. आहे ती परिस्थिती स्वीकारून किंवा आहे ती परिस्थिती बदलण्याची जबाबदारी स्वीकारा.
26. सिंह हे शिकार करण्याचे स्वप्न पाहत बसत नाही तर ते जातात आणि शिकार करतात.
27. तुम्ही हरला म्हणजे सर्व संपले असे नाही तर संपेल तेव्हा, जेव्हा तुम्ही माघार घ्याल.
28. स्वतःला ओळखणे म्हणजे स्वतःला स्वतःमधील माहित नसलेले सामर्थ्य माहिती होणं.
29. कोणत्याही कामाला सुरुवात आजच करा.कधी कधी उद्याचा अर्थ ‘केव्हाच नाही’ असा पण होतो.
30. जेव्हा तुम्हाला थकल्यासारखे वाटेल तेव्हा प्रेरणा देणाऱ्या गोष्टी आठवा आणि जेव्हा तुम्हाला स्वतःवर विश्वास वाटणार नाही तेव्हा तुमच्यावर विश्वास ठेवणाऱ्या लोकांना पाठवा.
31. यशस्वी लोक काम करत राहतात ते चूकाही करतात पण ते कुठलेही काम अर्ध्यावर सोडत नाही.
32. भविष्याचा अंदाज लावण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे ते भविष्य स्वतः तयार करणे.
33. जेव्हा तुम्ही स्वतःचे स्वप्न पूर्ण करायचे ठरवता. तेव्हा रिकाम्या गोष्टीसाठी वेळ देऊ नका.
34. बुद्धीने विचार करा मनावर विश्वास ठेवा आणि तुम्हाला हवं असेल ते सध्या करा.
35. हवं असलेलं मिळवण्यासाठी स्वतःमध्ये बदल करा किंवा आहात तसेच रहा.
36. स्वप्न बघून चालत नाही तर ते पूर्ण करण्यासाठी झोप पण उडाली पाहिजे.
37. अपयश मिळेल म्हणून घाबरू नका प्रयत्नांवर विश्वास ठेवा.
39. कधी कधी प्रयत्न करत असताना तुम्हाला अपयशाची भीती वाटेल पण घाबरू नका तुम्ही जिंकाल किंवा शिकाल.
40. तुमच्यात असणाऱ्या क्षमतेपेक्षा तुमची ध्येय कधीच कमी असायला नको.
41. हरीणच्या मतानुसार सिंह कधीच झोपत नाही म्हणून हरीण सदैव सतर्क असते.
42. तुम्ही जिथे असाल तिथून सुरुवात करा. तुमच्या जवळ जे असेल त्याचा वापर करा आणि ते करा जे तुम्हाला जमतं.
43. आपण किती समोर आलो आहोत फक्त यासाठीच मागे वळून पहा.
44. संकटांना घाबरून मागे फिरायचे की धैर्याने त्यांना सामोरे जायचे? निर्णय तुमचा आहे.
45. साधी सरळ दिसणारी माणसं मूर्ख नसतात ते फक्त हाच विचार करतात की समोर दिसणारी माणसं चांगल्या मनाची आहेत.
46. जे तुमचे क्षमतांवर टीका करतात. ते चुकीचे आहेत हे तुम्ही सिद्ध करा.
47. अयशस्वी झाल्यानंतर एखादच स्वप्न अपूर्ण राहते मात्र मनात येणाऱ्या शंका तुमची खूप सारी स्वप्न कायमची नष्ट करतात.
48. यश मिळवण्यासाठी मार्ग शोधा ते न मिळवण्यासाठी कारणे नाही
49. सर्वात चांगला नजारा एकाद शिखर चढल्यानंतरच दिसतो.
50. आपण तेव्हाच हरणार जेव्हा आपण प्रयत्न करणे सोडणार.
Marathi Suvichar Status | मराठी सुविचार स्टेटस
1. प्रत्येक अंतर हा कशाचीतरी सुरुवात असतोच.
2. यशस्वी लोक जन्माला येत नसतात तर ते स्वतःला यशस्वी बनवतात.
3. एक दिवस मी नक्की म्हणेल, मला जे हवं होतं ते मी मिळवलं आहे.
4. स्वतःचा रस्ता स्वतःच तयार करा.
5. कोणतेही काम मनापासून करा किंवा करूच नका.
6. जोपर्यंत तुमचे प्रयत्न सुरू आहेत तोपर्यंत काही संपत नाही.
7. तुमच्यासारखे फक्त तुम्हीच आहात विनाकारण कुणाशी तुलना करत बसू नका.
8. तुमच्याजवळ नसलेलं, तुम्हाला मिळवायचं असेल तर त्यासाठी असे प्रयत्न करा जे तुम्ही याआधी कधीच केलेले नसतील.
9. जोपर्यंत तुम्ही प्राप्त करत नाहीत तोपर्यंत ते कुणालाच सांगू नका.
10. तुमच्या यशाची उंची ही तुमच्या प्रामाणिकपणा आणि मेहनतीवर अवलंबून असते.
11. आताच्या परिस्थितीनुसार तुमचे भविष्य ठरत नसते तर तुम्ही आता घेतलेल्या निर्णयाने तुमचे भविष्य घडत असते.
12. एखादं काम अर्ध्यावर सोडायच्या आधी एकदा हा विचार करा की मी हे काम सुरू का केलं होतं?
13. चुका होणं हा तुम्ही ते काम करताय याचा पुरावा आहे.
14. छोटी विचार करू नका तुमच्या मनाला पटवून द्या की तुमची स्वप्ने खूप मोठी आहेत.
15. परिस्थिती आहे तशी स्वीकारा मात्र तुम्हाला जशी हवी तशी तयार करा.
16. बरेच लोकांना जे हवे ते मिळत नाही कारण त्यांना नेमकं काय हवं आहे हेच त्यांना माहिती नसते.
17. जे स्वतःच्या मनावर नियंत्रण ठेवू शकत नाही. ते जीवनात काहीच करू शकत नाही.
18. माझं भविष्य ही माझ्या वर्तमानापेक्षा चांगल असेल कारण ते बदलण्यासाठी मी खूप प्रयत्न करत आहे.
19. स्वप्न पूर्ण करण्यासाठी स्वतःला त्याच्या बंधनात बांधा तरच ती पूर्ण होतील.
20. जेव्हा तुम्ही म्हणाल ‘मी हे करू शकतो’ आणि ‘हे मी नाही करू शकत’ तेव्हा तुम्ही स्वतःला ओळखलेलं असेल.
21. जुन्या किल्ल्यांनी नवीन कुलूप उघडत नाही. बदल स्वीकारा त्यानुसार स्वतःमध्ये बदल करा.
22. संधीच एक दार बंद झालं तर दुसरं उघडतं, फक्त ते शोधा…
23. तुमचं सर्वात मोठे यश, हे तुमच्या सर्वात मोठ्या अपयशाच्या अगदी पलीकडे असू शकते.
24. थांबू नका वेळ कधी बदलेल, काहीच सांगता येत नाही.
25. नियोजनाशिवाय एखाद ध्येय म्हणजे फक्त इच्छा असते.
26. आपण एवढं समजदार तर असायलाच हवं की कोणत्या गोष्टी आपल्याला यशापासून दूर ठेवत आहेत हे कळावं.
27. सर्व जग बदलण्याचा विचार करतील तर स्वतःला कोण बदलणार?
28. कोणतेही ध्येय पूर्ण करण्यासाठी फक्त 1% प्रेरणेची आणि 99% मेहनत करण्याची गरज असते.
29. एखादी गोष्ट मिळाली नाही म्हणून नाराज होऊ नका कारण जगात एखाद्यालाच सर्व काही कधीच मिळत नसतं.
30. सुरुवात करण्यासाठी महान असणे गरजेचे नाही मात्र महान बनण्यासाठी सुरुवात करण्याची गरज असतेच.
31. कोणतीही गोष्ट ती मिळेपर्यंतच अशक्य असते.
32. तुम्ही निवडलेल्या ध्येयाने तुम्हाला प्रेरणा द्यायला हवी. ते नाही मिळणार म्हणून त्याची भीती वाटायला नको.
33. क्वचितच असं होतं की मिळवलेले यश हे अपयश न येता मिळालेलं असतं.
34. एखादं यश न मिळाल्यास बहुधा झोप लागत नाही तर उठा आणि काहीतरी करा झोप न घेतल्याने यश मिळत नाही.
35. तुम्ही करत असलेल्या कामात जर तुम्हाला आनंद मिळत नसेल तर यश कधीच मिळणार नाही.
36. तुम्ही केलेल्या चूका फक्त तुम्हीच सुधारू शकता.
37. सोप्या मार्गाने गेले पेक्षा ज्या मार्गाने यश मिळेल त्याच मार्गाने जावे.
38. अपयशाची कारणे असतात तर यशाचे किस्से असतात. तुम्हांला काय सांगायला आवडेल?
39. किती उंच उडू शकतो हे पंख ठरवतात तर कुठपर्यंत उंच उडायचे आहे आपलं मन ठरवत असतो.
40. खरं पण यश म्हणजे आपण प्रयत्न करण्यातच अपयशी होणे.
41. दुःखी व्हा किंवा स्वतःला प्रेरित करा कारण तुमचे ध्येय तुम्हीच निवडलेल आहे.
42. बरेच लोक त्यांचे स्वप्न प्रमाणे जगात सुद्धा नाहीत फक्त त्यांना वाटत असलेल्या भीतीमुळे.
43. आपण आज, आत्ता काय करत आहे यावरून आपले भविष्य ठरत असते.
44. आयुष्य प्रकाशित करण्यासाठी अंधाराचा सामना करावाच लागतो.
45. माझी सर्वात चांगली गोष्ट ही नाही, की मी कधी हरलोच नाही तर हरल्यानंतर मी पुन्हा उभा राहिलो आहे.
46. मनापासून एखादी गोष्ट न केल्यास ती कधीच मिळत नाही.
47. जगण्यात दोन बाजू असतात, सुख आणि दुःख त्या मधील आपण कुठली पाहतो हे महत्त्वाचे असते.
48. यशाकडे जाणाऱ्या जिन्याकडे न पाहता येणाऱ्या प्रत्येक पायरीवर लक्ष केंद्रित करा.
49. येणारं प्रत्येक संकट, अपयश तुम्हाला यशाकडे जाण्यासाठी प्रेरणा देते फक्त तुम्ही खचून न जाता त्याचा आधार घ्या.
50. तुमच्यात असणाऱ्या गुणांनुसार तुम्हाला संधी मिळतील असं नाही तर संधी नुसार स्वतःमध्ये गुण अवगत करायला शिका.
Inspirational Success Marathi Suvichar | Motivational मराठी सुविचार
1. तुम्ही जर तेव्हा परत प्रयत्न करण्यासाठी साठी उभे राहता जेव्हा सर्व संपलेलं असते तर निश्चितच तुम्ही आयुष्यात काहीही करू शकता.
2. हसण्याला तेव्हा जास्त अर्थ असतो जेव्हा तुम्ही संकटांनी घेरलेले असता.
3. जोपर्यंत तुम्ही अपयशी पचवू शकत नाही तोपर्यंत तुम्ही यश मिळवू शकत नाही.
4. कोणतेही महान व्यक्ती संधी मिळत नाहीत म्हणून तक्रार करत नाही तर संधी निर्माण करण्यासाठी प्रयत्न करतात.
5. एखाद्या व्यक्तीची ईच्छाशक्ती, दृढनिश्चय आणि सातत्यपूर्ण प्रयत्न त्याला आपल्या ध्येयाकडे खात्रीपूर्वक घेऊन जातात.
6. लोकं असं जरूर म्हणतात की तुम्ही चांगलं करा मात्र हे कधीच म्हणत नाही की माझ्या पेक्षा चांगलं करा.
7. विश्वासाच्या पायावर उभे असलेले स्वप्न अपयशाला घाबरत नाहीत.
8. आयुष्यात जर यशस्वी व्ह्यायचं असेल तर बोलण्यापेक्षा ऐकण्यावर जास्त भर द्या.
9. आयुष्याचा हाच उद्देश आहे की आपल्या आयुष्याला काही उद्देश असावा.
10. हुशारी तर सर्वांकडे असते, कुणाची लपून राहते तर कुणाची नजरेस पडते.
11. जीवनात शांती हवी असेल तर लोकांच्या ऐकण्याकडे दुर्लक्ष करा.
12. आपल्या स्वप्नांना नेहमी जिवंत ठेवा. स्वप्नांमधील चिंगारी जर विझली तर तर तुमच्या स्वप्नांनी आत्महत्या केली असं वाटेल.
13. सगळ्याच गोष्टीमध्ये तुम्ही तरबेज नसाल मात्र अश्या बऱ्याच गोष्टी आहेत ज्यात तुम्ही तरबेज असाल त्या शोधा.
14. माणूस हा आपल्या विचारांनी तयार झालेला प्राणी आहे. तो जसा विचार करतो तसा बनतो.
15. प्रत्येक लहान गोष्टीमध्ये केलेली सुधारणा ही मोठ्या यशाच्या जवळ घेऊन जाते.
16. जर हरायचीच भीती वाटत असेल तर जिंकण्याची आशा पण सोडून द्या.
17. कधी कधी आयुष्य आपल्याला हवं ते देत नाही मात्र ते काम नक्की देतो जे आपण करू शकतो.
18. जीवन सोपं नसते तर त्याला सोपं बनवावं लागते. कधी लक्ष देऊन तर कधी दुर्लक्ष करून.
19. त्यांच्यासाठी आवर्जून आनंदी राहायचं जे आपल्याला आनंदात पाहू शकत नाही.
20. काही गोष्टी ह्या फक्त प्रयत्न करून मिळत नाही तर वेळेनुसार आपसूकच मिळतात.
21. माझ्या चुकीच्या गोष्टी मला सांगा कारण त्या मला सुधारायच्या आहेत इतरांना नाही.
22. जीवन हे मोबाईल मधील गेम सारखं झालं आहे एक लेवल पूर्ण केल्यावर पुढे त्यापेक्षा आणखी कठीण लेवल असते.
23. जीवनात कधीच कुणाला दोष देऊ नये कारण चांगले लोकं आनंद देतात आणि वाईट लोकं अनुभव.
24. अपयश मिळणं ही शोकांतिका नाही तर यशासाठी प्रयत्नच न करणे ही सर्वात मोठी शोकांतिका आहे.
25. शांत राहणे केव्हाही चांगले कारण जगात पाहिले तर जास्त बोलणारेच दुःखी असतात.
26. कोणतंही चांगल कार्य करणे सुरुवातीला अवघडच असते.
27. यशाच्या शिखरावर चढल्यानंतर लोकांना फक्त आपलं यश दिसतं, आपण घेतलेले कष्ट नाही.
28. दृष्टिकोन खूप छोटी गोष्ट आहे मात्र त्यामध्ये जीवन बदलावण्याचे सामर्थ्य आहे.
29. मुर्खांच्या चर्चेत शहाणपणाच्या गोष्टी करणे म्हणजे मूर्खपणाच आहे.
30. सर्वात यशस्वी माणूस तोच हसत हसत केव्हाही मरणासाठी तयार असतो.
31. तुमच्यावर किती लोकं विश्वास ठेवतात किंवा ठेवत नाही हे महत्वाचं नाही तर तुमचा स्वतःवर किती विश्वास आहे हे जास्त महत्वाचं आहे.
32. प्रयत्न करणे कधीच सोडू नका, गुच्छातील शेवटही चावीसुद्धा कुलूप उघडू शकते.
33. जीवन जगण्याचे दोन नियम. पहिला फुलासारखं निखरावे आणि दुसरा सुगंधासारखं पसरावे.
34. जिंकणारे वेगळ्या गोष्टी करत नाही तर ते गोष्टी वेगळ्या पद्धतीने करतात.
35. वेळेला व्यर्थ घालवणं म्हणजे वेळेची हत्या केल्यासारखं आहे.
36. जे प्रयत्न न करता मिळतं ते जीवनभर टिकत नाही आणि जे जीवनभर टिकतं ते प्रयत्न न करता मिळत नाही.
37. फक्त जिंकणाराच नाही तर कुठं हरावं हे कळणारा सुद्धा महान असतो.
38. जो परिस्थितीनुसार बदलतो तोच समोर जातो.
39. आनंद तुमच्या शहाणपणावर अवलंबून असतो तर तुमच्याजवळ काय आहे यावर नाही.
40. मनाने तुम्हाला नियंत्रणात ठेवण्याआधी तुम्ही तुमच्या मनाला नियंत्रणात ठेवा.
41. कमजोर लोकं बदला घेतात, शक्तिशाली लोकं माफ करतात तर बुद्धिमान लोकं दुर्लक्ष करतात.
42. एकाच विनोदावर आपण परत हसत नाही तर एकाच दुःखावर तरी परत परत का रडायच.
43. यशस्वी तो असतो जो आपल्या दुश्मनावर नाही तर आपल्या ईच्छावर विजय मिळवतो.
44. जेव्हा भविष्य धुक्यासारख अस्पष्ट दिसते तेव्हा आपला फोकस हा वर्तमानावर असायला हवा.
45. यशस्वी लोकांच्या चेहऱ्यावर दोन गोष्टी असतात. एक शांतता आणि दुसरी Smile.
46. आपण व्यस्त राहिलं की सर्व काम सोपी होतात तर आपण आळशी असलो की सर्वकाही कठीण असते.
47. स्वतःला हे नका सांगू की संकट किती मोठं आहे तर संकटांना सांगा की तुमची मेहनत किती जास्त आहे.
48. जगाला समजून घेणं आणि स्वतःला समजून घेणं यात खूप मोठा फरक असतो.
49. जर आज तुम्ही कमाईपेक्षा जास्त मेहनत करत असाल तर खूप लवकर तुम्ही मेहनतीपेक्षा जास्त कमाई करणार.
50. स्वप्न ज्यांचे मोठे असतात परीक्षा त्यांच्या खूप अवघड असतात.
Good Morning Marathi Suvichar | शुभ सकाळ मराठी सुविचार
1. पाण्याचे थेंब फुलांना भिजवत आहेत, वाऱ्याची थंड झूळूक मनाला मोहून टाकत आहे, तुम्ही पण या, एक सुंदर सकाळ तुम्हाला जागी करत आहे.
2. जिंकणे निश्चित असेल तर कायर सुद्धा लढू शकतात. बहादूर तर ते असतात जे हार समोर दिसत असतानासुद्धा मैदान सोडत नसतात.
3. सकाळी उठल्यावर सर्वांजवळ दोन पर्याय असतात. (एक) उठा आणि आपले स्वप्न पूर्ण करा. (दोन) झोपत रहा आणि स्वप्न बघत रहा.
4. जीवनात अडचणी दररोज नव्या येतात, जिंकतात तेच ज्यांचे विचार आणि कृती मोठ्या असतात.
5. संघर्षाच्या वाटेवर जो चालत असतो, तोच जगाला बदलत असतो, ज्यांनी रात्रीवे विजय मिळवला आहे, सूर्य म्हणून तोच चमकला आहे.
6. समोर दिवस असो की रात्र काळजी करू नका. फक्त एवढी काळजी घ्या की तुमच्या मनात अंधार होऊ देऊ नका.
7. कुणी तरी फार छान म्हटलं आहे, जीवनात घाबरून का जातो दुःखाने, जीवनाची सुरुवातच होत असते रडण्याने.
8. बिंदास हसावं दुःख काय आहे, जीवनात कुणाला टेंशन कमी आहे.चांगलं आणि वाईट हा फक्त एक भ्रम आहे कारण जीवनाचं नावच कभी ख़ुशी कभी गम आहे.
9. जीवन हसत-हसत जगावं, प्रेम आणि आनंद मिळत राहावं, नवीन सकाळच्या खूप साऱ्या शुभेच्छा.
10. वेळ तुमची आहे. हवं त्याला सोनं बनवा किंवा स्वप्न बघत झोपेत व्यर्थ करा.
11. जीवनात अडचणी त्यांनाच येतात जे जबाबदारी स्वीकारायला तयार असतात आणि जबाबदारी स्वीकारणारे कधी हरत नसतात एकतर जिंकतात किंवा शिकतात.
12. हसा आणि हसवत राहावं, प्रत्येकाने आनंदात रहा, माझी आठवण नाही काढली तरी चालेल मात्र रोज तुमची आठवण काढणार.
13. इतरांचा सल्ला घेऊन रस्ता सापडेल मात्र मंजिल मिळवण्यासाठी प्रयत्न आपल्यालाच चालावं लागेल.
14. रोज सकाळी जीवनाची सुरुवात होते, कुणा खास व्यक्तीसोबत प्रेमळ बोलणं व्ह्याव म्हणून तुम्हाला शुभ सकाळ म्हणतोय.
15. सकाळी-सकाळी भरावी आनंदाची जत्रा. ना इतरांची काळजी, ना दुनियाची पर्वा. एक रम्य, आनंदादायी सकाळच्या तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा.
16. प्रत्येक रस्ता अवघड नसावा, त्यावर आनंदाचा वर्षाव असावा, प्रत्येक दिवस खास असावा अन दिवसासारखं जीवनही खास असावं
17. विश्वास स्वतःवर ठेवला तर ताकद बनतो अन इतरांवर ठेवला तर कमजोरी बनते.
18. हा फक्त एक दिवस नाही तर आपलं स्वप्न पूर्ण करण्यासाठी मिळालेली एक संधी आहे.
19. स्वतःमध्ये काही करून दाखवण्याची हिम्मत असेल तर स्वतःवर विश्वास ठेवा, इतरांवर ठेवलेला विश्वास कधीही तुटू शकतो.
20. जीवनात हवं ते मिळवा मात्र एवढं जरूर लक्षात ठेवा की तुमच्या यशाचा रस्ता हा कुणाच्या मनाला तोडून जाणारा नको.
21. असो कोण आहे ज्याच्या काहीच कमी नाही आहे, आभाळाजवळ सुद्धा कजमीन नाही आहे.
22. कधीच हिम्मत हरू नका, जीवनात संपण्यासारखं असं काहीच नाही. प्रत्येक नवा दिवस हा तुमचा वाट पाहत असतो.
23. प्रत्येक सकाळी आपण त्यांचीच आठवण काढतो, जे आपल्या मनात असतात.
24. कोण जाणे यमाचा निरोप कधी येईल, मी मात्र याच विचारात असतो की कधी तुमचा मॅसेज येणार आहे.
25. सकाळच्या शुद्ध हवेसोबत, सूर्याच्या कोवळ्या किरणासोबत, फुलांच्या मधुर सुगंधेसोबत सकाळच्या खूप साऱ्या शुभेच्छा.
26. फुलासारखे उमलत रहा, सूर्या सारखे चमकत रहा आणि दिवसभर आनंदी रहा.
27. सकाळ त्यांच्यासाठी नसते, ज्यांनी अपयशामुळे जीवनात प्रयत्न करणे सोडले आहे. सूर्याची किरणे तर त्याच्यासाठी आहेत, जो अपयशी होऊन सुद्धा पुन्हा लढायला तयार आहे.
28. सुरुवात करण्यासाठी महान असण्याची गरज नाही मात्र महान बनण्यासाठी सुरुवात करणे आवश्यक असते.
29. एका क्षणासाठी का होई ना, दुसऱ्याच्या चेहऱ्यावर आनंद आणून बघा, मनाला काहीतरी कमावल्या सारखं वाटेल.
30. रात्र संपली, पुन्हा आनंददायी सकाळ आली, मनाला पुन्हा तुमची आठवण आली.
31. जर कालचा दिवस चांगला होता तर थांबू नका, होऊ शकते तुमच्या यशाची ही सुरुवात असेल.
32. स्वप्नातील जगातून आता बाहेर या, सकाळ झाली आहे आता जागे व्हा, चंद्र-ताऱ्याना सोडून परत या आणि आजच्या दिवसाचा आनंद घ्या.
33. रात्र येते तारे घेऊन, झोप येते स्वप्न घेऊन. ईच्छा आहे माझी आज सकाळ तुमच्यासाठी येवो आनंद घेऊन.
34. रात्र सकाळची वाट पाहत नाही, सुगंध हवामानाची वाट पाहत नाही. जे मिळेल त्याचा आनंद घ्या कारण जीवन वेळेची वाट पाहत नाही.
35. प्रत्येक नवीन सकाळ आपल्यासाठी नवीन संधी आणि विचार घेऊन येते.
36. सकाळी उठल्यापासून चेहऱ्यावर आनंद हवा, प्रत्येक दुःखापासून तुमच्यापासून दूर असावं, सुगंधित व्ह्याव तुमचं आयुष्य असा तुमचा दिवस असो.
37. दुःखाच रूपांतर सुखात करून बघा, एका ठिकाणी थांबल्यापेक्षा हळूहळू का होईना चालत रहा.
38. स्वप्ने सत्यात आणायची असतील तर आधी झोपेतून उठाव लागेल. उठा मग.
39. नवीन विश्वासासोबत, उमलणाऱ्या फुलांच्या सुगंधासोबत तुमचा दिवस सुरु व्ह्यावा एका चांगल्या हसऱ्या चेहऱ्यासोबत.
40. जर हरण्याची भीती वाटत असेल तर जिंकण्याची ईच्छा पण बाळगू नये.
41. जे लोकं तुम्हाला जवळून ओळखत नाही त्यांच्या मतांना तुमच्या मनाच्या जवळ नका जाऊ देऊ.
42. पागल आणि हुशार यांच्यात एकच फरक आहे हुशारांना काही मर्यादा असतात तर पागल लोकांना कुठलीच मर्यादा नसते.
45. तारीफ करणाऱ्यापेक्षा टीका करणाऱ्यावर जास्त लक्ष द्या
46. चूक ती असते जिच्याकडून तुम्ही काहीच शिकत नाही.
47. त्यावर लक्ष्य ठेवा जे तुमच्याजवळ आहे, जे नाही त्यावर नाही.
48. यशस्वी तो असतो जो इतरांच्या आधी स्वतःला घडवत असतो.
49. यशस्वी तो होतो जो इतरांशी तुलना करत नाही.
50. गरज आणि ईच्छा यामधील फरक समजला म्हणजे माणूस यशस्वी होतो.
मराठी सुविचार लहान | Thoughts मराठी सुविचार
1. आनंदी राहण्याचे कारण लवकर शोधा नाहीतर जीवन दुःखाच्या संधी लवकर तयार करते.
2. कुणाला गीतेत ज्ञान मिळालं तर कुणाला कुराणात मिळालंत्यांना आभाळात देव कसा मिळेलज्यांना माणसात माणूस नाही दिसला
3. शब्द मनातून येतात, अर्थ लोकं मेंदूतून लावतात.
4. एखादं स्वप्नं खूप प्रयत्न केल्यानंतर सुद्धा पूर्ण नाही झालं तेव्हा दुसरं स्वप्न पाहून ते पूर्ण करण्यासाठी जेव्हा माणूस पुन्हा पाय रोवून उभा राहतो त्याला जीवन म्हणतात.
5. तक्रारी आता तुझ्यासोबत नाही, स्वतःसोबत आहेत. खोटं तू बोललीस मात्र त्यावर विश्वास तर मी ठेवला होता.
6. अंधार असणं अडचण नाही तर आपल्याला दिवा लावायला वेळ नाही किंवा तसं सुचत नाही.
7. एवढे चांगले नाही, लोकं फक्त गरजेच्या वेळीच आठवण काढतात आमची. शेवढी अंधार घालवण्यासाठी एका प्रकाश किरणाची गरज असते.
8. एवढं आनंदी रहा की दुःख आलं तर त्याने म्हणायला हवं ‘इथं कशाला आलो’
9. खरच जीवनात जर काही मिळावयाचं असेल आणि मिळत नसेल तर ते मिळवण्यासाठीचे तुमचे रस्ते बदलत रहा ध्येय नाही.
10. मोठा माणूस तो असतो, ज्याला भेटल्यावर स्वतःला कुणी लहान समजत नाही.
11. छोट्या छोट्या गोष्टीत आनंद शोधत रहा कारणं माणूस मोठ्या संकटापेक्षा छोट्या समस्यांनी जास्त त्रस्त असतो.
12. भविष्याची जास्त चिंता करू नका, इथं मरणार सगळेच आहेत.
13. मित्रांमध्ये श्रीमंती नका पाहू, काळजी घेणारे मित्र नेहमी गरीबच असतात.
14. शत्रू बनवण्यासाठी आता भांडण करणे गरजेचे नाही. तुम्ही फक्त यशस्वी व्हा ते आपोआपच तयार होतील.
15. यश एका दिवसात नाही मिळत पण मनापासून प्रामाणिक करत राहिलात तर एक दिवस नक्की मिळते.
16. त्यांच्यासाठी एक वेळ हरलं तरी चालेल ज्यांना दुसऱ्यासाठी जिंकायचं असते.
17. जीवन खूप अडचणीत व्यस्त आहे, तरी पण ते मस्त आहे.
18. अयशस्वी होतात ते सर्व प्रयत्न, जे मनापासून केल्या जात नाहीत.
19. जगात तेच लोकं काहीतरी विशेष करतात, ज्यांना लोकं म्हणतात तू काहीच करू शकत नाही.
20. संशय अन लोभात गुंतलेलं प्रेम नसते. मीराच्या प्रेमासारखं ते निस्वार्थ असते.
21. खूप त्रास होते त्या शिक्षेचा, जी गुन्हा न करताही मिळालेली असते.
22. जगाला ना प्रेम समजत, ना मैत्री समजते. जगाला फक्त स्वार्थ समजते.
23. भाग्य आणि इतरांना उगाचच दोष देऊ नये जे स्वप्न आपलं असेल तर त्यासाठी लागणारी मेहनत आपली स्वतःचीच असावी.
24. स्वतःला कधीच वाईट समजू नये कारण त्याचा ठेका लोकांना घेतलेला असतो.
25. कुठलाही माणूस जन्मापासून वाईट नसतो त्याची परिस्थिती आणि जबाबदारी त्याला वाईट बनवत असते.
26. सोबत त्यांची असावी ज्यांना आपण यशस्वी व्हावं असं मनापासून वाटतं.
27. जे परिश्रम तुम्ही आज करत असाल त्यानुसारच तुमचं भविष्य असेल.
28. माणसाकडून बोलले जाणारे शब्दच त्याला त्याच्या उन्नतीकडे नेतात.
29. इतरांविषयी तेच बोलावं जे तुम्ही स्वतःसाठी ऐकू शकता.
30. जीवनात शांतता हवी असेल तर इतरांच्या निरर्थक बोलण्याला महत्व देऊ नका.
31. यश मिळवायचं असेल तर आपले कान बंद ठेवा आणि आपलं लक्ष ध्येयावर केंद्रित करा.
32. यशाकडे जाणारे रस्ते कधीच सरळ नसतात मात्र यश मिळाल्यावर सर्व रस्ते सरळ होतात.
33. महान गोष्टी ह्या ताकदीने नाही तर सातत्यपूर्ण प्रयत्न केल्याने पूर्ण होतात.
34. चुकाकडूनही तेव्हाच शिकाल जेव्हा त्यांचा स्विकार कराल.
35. ‘मी सर्वोत्तम आहे’ हे बोलायचे नसते तर सिद्ध करावं लागते.
36. परिश्रमाशिवाय काहीच मिळत नाही पक्षी यांनाही अन्न घरट्यात मिळत नाही.
37. व्यस्त असणं महत्वाचे नसते तर कश्यामध्ये व्यस्त आहे हे जास्त महत्वाचे असते.
38. गेलेला दिवस नाही बदलू शकत मात्र येणारा दिवस नक्की बदलू शकतो.
39. वेळेजवळ इतका वेळ नसतो की वेळ तुम्हांला परत वेळ देईल.
40. प्रतिकूल परिस्थितीत स्वतःला सावरुन प्रयत्न करणारेच यशस्वी होतात.
मराठी सुविचार संग्रह | मराठी सुविचार व त्यांचे अर्थ
1. जेव्हा एखाद्याला यश मिळते, तेव्हा आनंदच होतो असं नाही, कुणाला तर पराकोटिच दुःख पण होतं.
2. जबाबदारी सुद्धा एक परीक्षाच असते, जो जबाबदारी स्वीकारते त्यालाच ती जास्त त्रास देते.
3. या जगात कधी काहीच संपणार नाही. सुरुवात करणं हेच चांगल.
4. माहीत नाही कसं प्रेम करतो आहे, जी माझी कधी होणारच नाही, मी तीचा होऊन बसलो आहे.
5. जी आपली काळजी करतात, तेच आपल्यावर खरं प्रेम करत असतात.
6. तिचा आठवणीने एवढं तरी कळलं की जे मनात असतात त्यांना कधीच विसरल्या जात नाही.
7. तुझ्या बोलण्यावरून एवढं तरी समजलं की, तू आता कुणा दुसऱ्याची भाषा बोलत आहेस.
8. राग येणारे लोकं खूप हुशार असतात, ते राग नेहमी आपल्यापेक्षा लहानांवरच काढतात.
9. रडल्याशिवाय तर कांदा सुद्धा कापता येत नाही, ही तर जिंदगी आहे सहज थोडी कापता येईल.
10. खऱ्या जीवनाची सुरुवात तुम्ही स्वतःसाठी बांधलेल्या भिंतीना तोडूनच होते.
11. आपण चांगले आहोत हे दाखवण्याचा प्रयत्न करा, दुसरे वाईट आहेत हे दाखवत बसू नका.
12. सरळ सोपं आहे, ज्यागोष्टीत मन लागत नाही ते काम करूच नाही.
13. जीवनात शांतता हवी असेल तर इतरांच्या गोष्टी मनावर घेऊ नका.
14. दुसऱ्याच्या दुःखात दुःख आणि सुखात सुख वाटायला हवं.
15. रडल्याने जर दुःख टळलं असतं तर या जगात कुणीच दुःखी नसतं.
16. तू बदलली, मी बदललो, हसण्यामागील कारणे बदलली पण रडण्यामागील कारण अजूनही तूच आहेस.
17. तू नसल्याची फक्त एकच खंत आहे, कितीही हसलं तरी डोळ्यात अश्रू हे येतातच.
18. कुणीतरी विचारलं प्रेम केलं होतं का कधी, मी म्हटलं अजूनही करत आहे.
19. थोडी वाट पाहायची असती तू, वेळ वाईट होती माझी, मी नव्हतो.
20. माझे तर डोळे पण त्यानेच उघडले, ज्याच्यावर डोळे बंद करून विश्वास ठेवला होता.
21. काही नाती खूपच वेगळी असतात, जोडता पण येत नाही आणि तोडता पण येत नाही.
22. फक्त कपडेच नाही तर विचार पण ब्रँडेडच ठेवा.
23. नुसती चष्मे लावून दृष्टी नका बदलू तर दृष्टिकोन पण बदला.
24. समजावून सांगतांना थोडीफार साथ पण द्या.
25. पाहून न पाहिल्यासारखं कुणी करत असेल तर शांत राहून त्याच्या आयुष्यातून दूर जा.
26. बरेच मरत असतील तुझ्यावर पण मला तुझ्यासोबत मरायचं आहे.
27. जेवढी मोठी स्वप्ने असतात, परीक्षा पण तेवढ्याच कठीण असतात. 28. तुम्ही ठरवाल तेवढ्याच मर्यादा तुम्हाला आहेत.
29. अशाच लोकांसोबत रहा ज्यांनी तुम्हाला हवं ते यश मिळवलं आहे किंवा त्यासाठी प्रयत्न करत आहेत.
30. कधी चालले नसाल तर चाला, चालले असाल तर पळा, फक्त एका ठिकाणी उभे राहू नका.
31. चांगल्या चालकांची तपासणी ही खड्ड्यांच्या, वळणाच्या आणि घाटाच्या रस्त्यावरच होते.
32. चुकीचेही आभार माना, कारण तीच आपल्याला शिकवते.
33. जे उघड्या डोळ्यांनी स्वप्न बघतात व ती पूर्ण करण्यासाठी धडपडतात त्यांचे जीवन यश मिळेपर्यंत कधीच सोपं नसतं.
34. मोठे होण्यासाठी स्वतः जबाबदारी असून खूप गरजेचे आहे.
35. जे सुरू केलंय त्याला पूर्ण करा अर्ध्यावर सोडू नका.
36. प्रत्येक दिवशी तुमच्या शिकण्यात, ज्ञानात, आणि मेहनतीत सुधारणा व्हायला हवी तरच यश मिळेल.
37. तुमचे सातत्यपूर्ण प्रयत्न टिकून राहिले तर ते तुम्हाला हवं ते मिळवून देईल.
38. बऱ्याच वेळा यशआधी, स्पष्टपणे अपयश आणि निराशा येते.